अखेर केंद्र सरकारला जाग, ‘प्रोजेक्ट चित्ता‘साठी अकरा सदस्यीय समिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेल्या चार चित्त्यांचा मृत्यू गेल्या दोन महिन्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे चित्त्यांचा अधिवास आणि वन्यजीव व्यवस्थानाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून त्यांनी चित्ता प्रकल्पाच्या प्रगतीचे पुनरावलोकन आणि निरीक्षण करण्यासाठी 11 सदस्यांच्या समितीची नियुक्ती केली आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये एकापाठोपाठ एक चित्त्यांचा मृत्यू होत आहे. चित्त्यांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण तयार केल्यानंतरही त्याचा फारसा सकारात्मक परिणाम दिसत नाही. त्यामुळेच आता सरकारने चित्ता प्रकल्पाच्या प्रगतीचे पुनरावलोकन आणि निरीक्षण करण्यासाठी समिती नेमली आहे. ग्लोबल टायगर पह्रमचे सरचिटणीस राजेश गोपाल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून त्यामध्ये राजस्थानचे माजी मुख्य वनसंरक्षक आर. एम. मेहरोत्रा, हिंदुस्थान वन्यजीव संस्थेचे माजी संचालक एच. एस. नेगी, एपीसीसीएफचे पी. के. मलिक, डब्ल्यू आयआयचे जी. एस. रावत, मित्तल पटेल, अहमदाबादचे सामाजिक कार्यकर्त्या कमर कुरेशी आदींचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती चित्ता प्रकल्पावर केवळ देखरेख करणार नाही, तर समुदाय इंटरफेस आणि प्रकल्पाच्या कृतीमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल सुचना देईल. पुढील दोन वर्षे दर दोन महिन्याला या समितीची बैठक होणार आहे.