
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज असलेल्या चिनाब ब्रिजचे उद्घाटन केले. हे उद्घाटन झाल्यानंतर, या पूलासाठी भू-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून काम करणाऱ्या डॉ. जी. माधवी लता यांच्याबद्दल वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर खूप कौतुक झाले. यावर जी. माधवी लता यांनी या पुलाच्या यशाचे श्रेय हे हजारो अनसंग हिरोंना दिलेले आहे. याचबरोबर त्यांनी मला अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका असे आवाहनही केले आहे.
माधवी लता यांनी आपली भूमिका मोठ्या सांघिक प्रयत्नांचा भाग असण्यावरच भर दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब पुलाचे उद्घाटन केले, जो जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. देशाने या कामगिरीचा आनंद साजरा केला, तेव्हा दीर्घकाळ योगदान देणाऱ्या प्रोफेसर जी. माधवी लथा यांनी हजारो “अनसंग हिरोंना” श्रेय दिले आहे. तसेच लोकांनी त्यांना उगाचच प्रकाशझोतात आणू नये अशी विनंतही त्यांनी केली आहे.
माधवी लता यांच्यावर झालेल्या कौतुकानंतर त्या म्हणाल्या, या पुलाच्या कामासाठी मी लाखो अज्ञात नायकांना सलाम करते. “माझी भूमिका उतार स्थिरीकरण योजना विकसित करण्यात आणि उतारावरील पाया डिझाइन करण्यात मदत करणे ही होती,” असे तिने उद्घाटनानंतर शेअर केलेल्या लिंक्डइनवरील संदेशात त्यांनी म्हटले आहे.
चिनाब पुलाशी गेल्या 17 वर्षांपासून संबंधित असलेल्या डॉ. लता यांनी, त्यांच्यावर झालेल्या कौतुकाला त्यांनी उगाचच मला प्रसिद्धी झोतात आणू नका असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्यावर मोहिमेतील महिला, तसेच पूल बांधण्यासाठी चमत्कार करणारी अशी अनेक बिरुदं त्यांच्यावर माध्यमात आली होती यावर त्यांनी या सर्व बिरुदांना निराधार असे म्हटले आहे. पुलाचे काम करणाऱ्या करणाऱ्या हजारोंपैकी मी एक आहे असे त्या म्हणाल्या आहेत.