Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी चकमक झाली. या चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळाहून एके-47/एसएलआर रायफल, इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

नारायणपूर येथील अबुझमद प्रदेशातील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी कारवाई सुरू केली, असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी सांगितले. दुपारपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असून आतापर्यंत चकमकीत सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे.