
मधुमेहींसाठी आहार हा खूप महत्त्वाचा मानला जातो. योग्य वेळी खाणं हे मधुमेहींसाठी खूप गरजेचे मानले जाते. याशिवाय मधुमेहींना आहारामध्ये फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. हा आहार केवळ मधुमेहींसाठी नाही तर, सर्वांसाठी गरजेचा आहे. मधुमेही रुग्णांच्या आहारात फायबर फार महत्त्वाची भूमिका बजावते. फायबरमुळे शरीराचे अन्न पचवण्याचे प्रमाण नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. फायबरयुक्त पदार्थांमध्ये भाज्या, फळे, शेंगा, बीन्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी आहाराचा मार्ग अवलंब करणे सर्वात सोयीस्कर. वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या उद्दिष्टांनुसार प्लॅनिंग करायला हवे. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याव्यतिरिक्त, निरोगी आहाराचे इतर फायदे देखील आहेत. कारण या आहारात भरपूर प्रमाणात फळे, भाज्या आणि फायबरची शिफारस केली जाते, त्यामुळे त्याचे पालन केल्याने हृदयरोग आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.
मधुमेहामुळे रक्तवाहिन्या बंद होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. म्हणूनच जास्त चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि लोणी, बीफ, हॉट डॉग, सॉसेज आणि बेकन सारखे प्राणी प्रथिने टाळा. नारळ आणि पाम तेलचा वापर मर्यादित करायला हवा. प्रक्रिया केलेले स्नॅक्स, बेक्ड पदार्थ तसेच ट्रान्स फॅट्स टाळावे. उच्च चरबीयुक्त प्रथिने, अंड्याचा पिवळा भाग या गोष्टी खाण्यामध्ये टाळणे हितावह आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)