
राज्यसभेच्या आठ जागांसाठी निवडणूक आयोगाने आज निवडणुका जाहीर केल्या. त्यासाठी 19 जून रोजी मतदान होणार आहे. यात दोन आसाम आणि तामिळनाडूतील सहा जागांचा समावेश आहे. दोन्ही राज्यांतील राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ अनुक्रमे जून आणि जुलैमध्ये संपणार आहे.
तामीळनाडूतील अंबुमणी रामदास (पट्टाली मक्कल कच्ची), एन चंद्रशेखरन (ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम), एम षण्मुगम (द्रविड मुन्नेत्र कळघम), पी विल्सन (द्रमुक), वैको (मारुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. तर आसाममधील राज्यसभा सदस्य वीरेंद्र प्रसाद वैश्य ( भाजपा) आणि मिशन रंजन दास यांचा कार्यकाळ 2 जून रोजी संपत आहे.
देशातील चार राज्यांतील पाच विधानसभा जागांवरही निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून याबाबतची माहिती दिली. गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.