‘ईएसआय’ हॉस्पिटलच्या कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही! कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, संपाचा इशारा

राज्य कामगार विमा योजनेच्या (‘ईएसआय’) शेकडो कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने पगार द्यावेत, अन्यथा काम बंद करून संप करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआय) महाराष्ट्रातील सर्व हॉस्पिटलमध्ये विविध पदांवर काम करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली. मुंबईतदेखील कांदिवली, मुलुंड, वरळी आणि उल्हासनगर येथील हॉस्पिटलमध्येसुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यामध्ये नर्सेस, लॅब टेक्निशिएन, क्लार्क, शिपाई आदी पदांवर कार्यरत आहेत. हे कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असताना काही हॉस्पिटलमध्ये पंत्राटी कर्मचाऱ्यांचा तब्बल चार महिन्यांपासून पगार झालेला नाही.