
तब्बल पाच वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. 36 यात्रेकरूंची पहिली तुकडी तिबेट मार्गे पवित्र स्थळी पोचली. हिंदुस्थानातील चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनी एक्सवर पोस्ट लिहिली की, आम्हाला आनंद वाटतोय की यात्रेकरूंची पहिली तुकडी तिबेटमधून मानसरोवर येथे पोचली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी 36 यात्रेकरूंचा जथा महत्त्वपूर्ण आहे. कारण पाच वर्षांच्या खंडानंतर या पवित्र ठिकाणी येणाऱया यात्रेकरूंचा हा पहिला समूह आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी 15 तुकडय़ा रवाना होणार आहेत. प्रत्येक बॅचमध्ये 50 यात्रेकरू असतील. पाच गट उत्तराखंड राज्यातील लिपुलेख दर्रे पार करून आणि 10 गट सिक्कीम येथून नाथुला दर्रे पार करून प्रवास करेल. जून ते ऑगस्ट दरम्यान यात्रा पार पडेल. कैलास मानसरोवर यात्रा पवित्र आणि कठीण यात्रांपैकी एक आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले हिंदुस्थानी नागरिक ही यात्रा करू शकतात. वयाची कमाल मर्यादा 70 आहे.