छत्तीसगडमध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात आज इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलांनी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गेल्या तीन दिवसांत 2 महिला आणि 5 पुरुष असे एकूण 7 नक्षलवादी चकमकीत ठार झाले. यामध्ये एक कोटी रुपये बक्षीस असलेला सुधाकर आणि 45 लाख रुपयांचे बक्षीस असलेला टॉप कमांडर भास्कर मारला गेला, असे पोलिसांनी सांगितले. कारवाईदरम्यान काही जवानांना साप आणि मधमाशांनी चावा घेतला. चकमकीच्या ठिकाणाहून 2 एके-47 रायफल, दारूगोळा आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. 5 जून रोजी पहिल्या चकमकीनंतर केंद्रीय समिती सदस्य सुधाकरचा मृतदेह सापडला.