
घोषणा करून तीन वर्षे उलटल्यानंतरही नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे. नवी मुंबईतून विमाने उडण्याची तारीख जवळ आली तरीही केंद्र सरकार या विमानतळाला दि. बां.चे नाव देत नसल्याने भूमिपुत्रांमध्ये प्रचंड संताप खदखदत असून 24 जूनला दि.बां.चा स्मृतिदिन आहे. त्याआधी नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव द्या, आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराच त्यांनी दिला.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक फक्त आणि फक्त दि. बां. चेच नाव नवी मुंबई वसवताना इथल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी मोठा लढा दिला. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा, यासाठी त्यांनी जनआंदोलने उभारली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देताना प्रसंगी स्वतःचे रक्त सांडले. त्यासाठी फक्त आणि फक्त या निस्वार्थी, निष्कलंक नेत्यांचे नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्र आग्रही आहेत.
आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर करीत तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला. त्यानंतर सर्वपक्षीय कृती समितीने भेटीगाठी घेऊन त्यांनाही निवेदन देऊन या मागणीचा पाठपुरावा केला. मात्र तीन वर्षे उलटली तरी हा ठराव केंद्र सरकारच्या टेबलावर धूळखात पडून आहे. 24 जून रोजी दि. बा. पाटील यांचा स्मृतिदिनी आहे. यादिवशी त्यांच्या नावाची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी भूमिपुत्रांनी केली आहे.
आंदोलनाची दिशा ठरणार
विमानतळाला नाव देण्यात यावे यासाठीचा ठराव पंतप्रधान कार्यालयात गेला आहे. मात्र केंद्र सरकारने या ठरावाच्या फायलीवरची धूळ अद्यापही झटकलेली नाही. त्यामुळे 30 मे रोजी सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे भूमिपुत्रांनी सांगितले.