
गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावण्यासाठी झालेल्या लढतीत पंजाबने मुंबईचा 7 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 184 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 39 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने धमाकेदार सुरुवात केली. प्रभासिमरन सिंग (13) लवकर आऊट झाला. परंतु त्यानंतर प्रियांश आर्य (35 चेंडू 62 धावा) आणि जोश इग्लिंस (42 चेंडू 73 धावा) यांनी चौफेर फटकेबाजी करत संघाचा विजय जवळपास निश्चितच केला. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पंजाबने 18.3 षटकांमध्येच यशस्वी पाठलाग केला आणि 19 पॉईंट्सची कमाई करत गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकाला.