एमसीए अकादमी ‘ब’ संघाला जेतेपद

पार्थ म्हात्रे आणि विराट यादव यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर एमसीए अकादमी ब केंद्राने कांदिवली केंद्राचा विजयी वारू रोखत 33 व्या एलआयसी एमसीए कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले.

मुंबईसह राज्यात मान्सूनचे 10 ते 12 दिवस आधीच आगमन झाल्यामुळे कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेचे सामने दोन दिवसांऐवजी 50 षटकांचे खेळवण्यात आले. कल्पेश गोविंद कोळी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना माटुंग्याच्या मेजर दडकर मैदानाऐवजी इतरत्र खेळवण्यात आला. डहाणूच्या अदानी क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमसीए अकादमी ‘ब’ पेंद्राने 50 षटकांत 9 बाद 198 धावा केल्या. हे आव्हान पेलताना कांदिवली केंद्राचा डाव 40 षटकांत 151 धावांवरच संपुष्टात आल्याने एमसीए अकादमी ‘ब’ केंद्राने 47 धावांनी विजय साकारला.

अदानीचे मानव संसाधन व प्रशासन विभागाचे प्रमुख नित्यानंद तिवारी यांनी अंतिम सामन्याचे उद्घाटन केल्यानंतर चुरशीच्या झालेल्या या सामन्यात एमसीए अकादमी पेंद्राचा डाव 5 बाद 92 अशा बिकट अवस्थेत असताना विराट यादव आणि पार्थ म्हात्रे यांनी सहाव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचत त्यांच्या डावाला आकार दिला. पार्थ म्हात्रेने 51 धावांची खेळी साकारली. त्याला विराट यादव (42) आणि कुशल पाटील (37) यांनी मोलाची साथ दिली.

एमसीए अकादमी ‘ब’ केंद्राने विजयासाठी ठेवलेले 198 धावांचे लक्ष्य पार करताना कांदिवली केंद्राने दमदार सुरुवात केली. पण 3 बाद 88 धावसंख्येवरून कांदिवली केंद्राचा डाव 151 धावांवरच गडगडला. विराट यादवने तीन तर शिव त्रिपाठी आणि नारायण ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट मिळवत विजयात मोलाचे योगदान दिले.

न्यू हिंद स्पार्ंटग क्लब आणि कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या संयोजन समितीकडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मुंबईचे माजी क्रिकेटपटू दयानंद (दया) दुधवडकर यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या नावाने दिला जाणाऱया पुरस्काराने यंदा ‘एबीपी माझा’चे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना गौरविण्यात आले.