Mumbai News – अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत घ्यावा लागणार प्रवेश

दहावीचा निकाल जाहीर होऊन जवळपास दीड महिना उलटल्यानंतर अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांना ही यादी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलैपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

अकरावी प्रवेशाचा यंदाही गोंधळ सुरु राहिला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप झाला आहे. अशा स्थितीत पहिल्या यादीसाठी 30 जूनची तारीख जाहीर केली होती. त्याच्या दोन दिवस आधी, शनिवारी पहिली यादी जाहीर करुन शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी आणि पालकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचा दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला. मात्र निकाल लागून जवळपास दीड महिना झाला तरी अद्याप विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश झाले नाही. यंदा एकूण 12 लाख 71 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.