
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमधील मुजफ्फरपुर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला, ज्याला राहुल गांधी यांनी अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत X हँडलवर एका पोस्टद्वारे या घटनेचा निषेध केला. त्यांनी लिहिले की, “मुजफ्फरपुर येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर उपचारात झालेली निष्काळजी अत्यंत लज्जास्पद आहे. जर तिला वेळीच उपचार मिळाले असते, तर तिचा जीव वाचवता आला असता. मात्र, डबल इंजन सरकारने केवळ सुरक्षेतच नाही, तर तिचा जीव वाचवण्यातही अत्यंत निष्काळजीपणा दाखवला.”
त्यांनी पुढे म्हटले की, “पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. दोषींवर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेने बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी बिहारमधील एनडीए सरकारवर टीका करताना म्हटले की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
मुजफ्फरपुर में दलित नाबालिग बेटी के साथ दरिंदगी और फिर इलाज़ में हुई लापरवाही बेहद शर्मनाक है।
अगर समय पर इलाज़ मिला होता, तो उसकी जान बचाई जा सकती थी। लेकिन डबल इंजन सरकार ने सुरक्षा तो दूर, जीवन रक्षा में भी घोर लापरवाही बरती।
पीड़ित परिवार को न्याय मिलने तक हम चुप नहीं… https://t.co/KPzLQHabCh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 1, 2025