
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. पोलीस उपायुक्त एमएन करिबासवन गौडा यांनी 4 जून रोजी होणाऱया विजयी परेडपूर्वी राज्य सरकारला पत्र पाठवून चेंगराचेंगरी होण्याचा धोका आहे, असा इशारा दिला होता.
आरसीबीचे चाहते देशभर आहेत. जर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडचा कार्यक्रम झाला तर लाखो लोक तिथे गर्दी करू शकतात. आमच्याकडे पुरेसे पोलीस बळ नाही, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था करणे अत्यंत कठीण होऊ शकते, असे डीसीपी गौडा यांनी म्हटले होते. हा नवीन खुलासा समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून सरकारवर जोरदार टीका होत आहे. जर चेंगराचेंगरीचा धोका आधीच माहीत होता तर इतक्या मोठ्या कार्यक्रमाला परवानगी का दिली, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, 4 जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली.