
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-कश्मीर दौऱ्यावरून असून त्यांनी 46 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रकल्पाचे आज लोकार्पण केले.
पंतप्रधान मोदी चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उदघाटन करून नंतर कटरा ते श्रीनगरदरम्यान दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला.
चिनाब नदीवर बांधलेला पूल हा हिंदुस्थानातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. हा पूल 1.3 किमी लांबीचा आणि 359 मीटर उंचीचा आहे.
हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. 260 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्यात तसेच भूकंपाच्या झोन-5 मध्येही पूल स्थिर राहू शकतो.
पूलाच्या बांधकामात 30,000 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
सुमारे 1500 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल हिंदुस्थानच्या अभियांत्रिकी शक्तीचे प्रतिक मानला जात आहे.