
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ढेकळाचा पंचनामा करायचा का, असे संतापजनक विधान करणाऱया माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असे म्हणत नवा वाद ओढवून घेतला आहे. कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रगतशील शेतकऱयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे विधान केले.