
‘तूं पाव्स्, मी पाव्स्, पाव्स् भरान इलो… सुक्या मनार, पाना पानार, पाव्स् पडान गेलो…’ बाहेर मुसळधार पाऊस आणि आत मालवणी कवितांची कोसळधार… ‘सुर्गेंचो वळेसार’ वातावरण पुंद करून गेलं… मन चिंब करून गेलं…. निमित्त होतं मालवणी ‘दादा’ माणूस म्हणजे प्रसिद्ध कवी दादा मडकईकर यांच्या चौथ्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे!
मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या ‘सुर्गेंचो वळेसार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत राज्याचे सांस्पृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकणातील मातीचा सुगंध आणि मालवणी भाषेचा गोडवा मुंबईकरांनी अनुभवला. यावेळी दादा मडकईकरांनी आपल्या खास ठेवणीतल्या पाऊस कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. दादा मडकईकर यांच्या कविता ऐकणे म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणी असते. त्याचा प्रत्यय यावेळी रसिकांनी घेतला. कार्यक्रमाचे निवेदन यामिनी दळवी हिने केले.
ॉदादा मडकईकर यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील मालवणी म्हणी एकत्रित करून ‘सुर्गेंचो वळेसार’ पुस्तक रसिकांसमोर आणलंय. या पुस्तकात सुमारे 450 म्हणी आणि मालवणी कवितांचा समावेश आहे. हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह आहे. याआधी त्यांनी ‘चांन्याची फुले’, ‘आबोलेचो वळेसार’, ‘कोकण हिरवेगार’ हे काव्यसंग्रह लिहिले आहेत.