
दुचाकी, चारचाकी विक्रीत घट झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा असेलेली अर्थव्यवस्था आपल्याला नको असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आकडे खरं बोलतात. दुचाकीची विक्री 17 टक्क्यांनी तर चारचाकींची विक्री 8.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर मोबाईल विक्री 7 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे खर्च आणि कर्ज दोन्ही वाढले आहेत. घराचं भाडं, घरखर्च, शिक्षणाचा खर्च जवळपास सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत.
तसेच ही फक्त आकडेवारी नाही तर त्या आर्थिक दबावाची सत्यता आहे ज्याच्याखाली प्रत्येक सामान्य माणूस पिचला जातोय. आम्हाला असे राजकारण हवे आहे ज्यात कुठल्याही प्रकारची इव्हेंटबाजी नको. ज्यात सर्मसामान्यांशी निगडीत प्रश्न हवेत, जिथे योग्य प्रश्न विचारले जातील, परिस्थती समजून घेतली जाईल आणि जबाबदारीने उत्तर दिले जाईल. आम्हाला अशी अर्थव्यवस्था नकोय ज्यात फक्त निवडक उद्योजकांचा फायदा होईल आम्हाला अशी अर्थव्यवस्था हवी आहे ज्याचा फायदा प्रत्येत भारतीयाला होईल असेही राहुल गांधी म्हणाले.
आंकड़े सच बोलते हैं।
पिछले एक साल में टू-व्हीलर की बिक्री 17% और कार की बिक्री 8.6% घट गई है। वहीं मोबाइल मार्केट 7% गिर गया है।
दूसरी तरफ, ख़र्च और कर्ज़ – दोनों लगातार बढ़ रहे हैं: मकान का किराया, घरेलू महंगाई, शिक्षा का खर्च, लगभग हर चीज़ महंगी होती जा रही है।
ये सिर्फ़…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 5, 2025