
तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे.
अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. मांडवी, रत्नागिरी) असे समुद्र किनारी मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.९) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल किड्ये हा तीन दिवसांपासून आपल्या राहत्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह भगवती किल्ल्या जवळ येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी रेलिंगच्या बाहेरिल बाजूस आढळला. तसेच अमोलची गाडी तशीच असून गाडीला चावी ही लावलेली होती. स्थानिक नागरिकांनी रोपवेच्या आधारे त्याचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अधिक तपास शहर पोलीस अमंलदार करत आहेत.






























































