
नारळपाणी म्हणजे तहानेवर मस्त गारेगार उपाय. नारळपाणी हा केवळ उन्हावरचा गारेगार उतारा नाही, तर नारळपाण्याचे शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. नारळपाणी पिल्यामुळे तन आणि मन दोन्हींना थंडावा मिळतो. पण हे नारळपाणी केवळ थंडावा देण्यापुरते उपयोगी नाही तर, याचे असंख्य फायदे आहेत. नारळपाणी हे आजारपणा व्यतिरिक्त इतर दिवसांमध्येही पिण्याचा डाॅक्टर सल्ला देतात. नारळपाण्यामध्ये असलेले असंख्य गुणधर्म हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात. म्हणूनच नारळपाणी हे कितीही महाग झाले तरी अनेकांच्या रोजच्या आहारात असतेच.
प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, जाणून घ्या
नारळपाण्यामुळे आपल्या शरीराला आतून थंडावा तर मिळतोच, शिवाय त्यामधुन मिळणाऱ्या पौष्टीक गुणांमुळे खूप फायदा होतो. नारळपाण्यात एनर्जी, प्रोटीन, कार्बोहाइड्रेटस्, फाइबर, आयरन, व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व मिळतात.
नारळपाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
नारळपाण्यात फेनोलिक असल्यामुळे, यामुळे कॅन्सर रोखण्यास खूप महत्त्वाची भुमिका नारळपाणी बजावते.
चेहऱ्याच्या त्वचेसाठी नारळपाणी हे खूप महत्त्वाचे मानले जाते. चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी नारळपाण्यासारखा दुसरा रामबाण उपाय नाही.
वजन कमी करण्यासाठी नारळपाण्याचा वाटा फार मोठा आहे. नारळपाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
नारळपाण्यामध्ये लिपिड कमी असल्याकारणाने, कोलेस्ट्राॅल वाढण्याची भीती नसते. म्हणूनच हृद्यरोगींना डाॅक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात.
वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये या डाळीचा समावेश करणे खूप गरजेचे
नारळपाण्यात पोटॅशियमच्या असलेल्या मुबलक मात्रेमुळे नारळपाणी ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी उत्तम मानले जाते.
फायबरची मात्रा नारळपाण्यात असल्यामुळे, पोटांच्या आजारावर नारळपाणी हे अतिशय गुणकारी मानले जाते. पोटाच्या आरोग्यासाठी म्हणूनच नारळपाणी हे सर्वोत्तम पर्याय मानले जाते.


























































