
तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने रविवारी विश्रांती घेतली असली तरी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला पूर आले. नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा या मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहे. नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे.या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे सहस्रकुंड धबधबा खळखळून वाहत आहे.