आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट; महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार! – संजय राऊत

मुंबईवर भाजपापुरस्कृत अदानीचे अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे. मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचा आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे फार मोठे षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचले जात आहे. 106 हुतात्म्यांच्या बलीदानातून मिळालेली मुंबई अदानीच्या घशात फुकटात घातली जात आहे. सगळे प्रमुख भूखंड अदानीला दिले जात आहेत. काल मदर डेअरीचा 18 हेक्टरचा भूखंड अदानीला दिला. सरकार महाराष्ट्राचे हित पाहत नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन आक्रमण थांबवायचे, लढायचे ते एकत्र येतील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभे केले. अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे. नाही तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही. ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जात आहे. आमचे नेते एका सुरात बोलत आहे की आम्ही सकारात्मक आहोत. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला लवण्यासारखे काही नाही, असे कॅप्शन दिलेले आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, पुस्तकात सुद्धा काहीच लपवलेले नाही. माझा स्वभाव लपवण्यातला नाहीच आहे. अख्खा महाराष्ट्र पुस्तक वाचत आहेत.

धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही

तीन दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो. मला दिल्लीतील अनेक प्रमुख नेत्यांनी फोन करून विचारले की, हे पुस्तक इंग्रजी, हिंदीमध्ये कधी येत आहे. इतकेच नाही तर दक्षिणेतल्या काही भाषांचे प्रकाशक हे पुस्तक त्या भाषेत काढू इच्छित आहेत. या पुस्तकाची मागणी प्रचंड आहे. या पुस्तकातले सत्य प्रखर आहे. ते सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक माझे विरोधकही वाचतील. संघाच्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या काही आमदार, खासदारांनी पुस्तक वाचून निरोप दिलेला आहे. पुस्तक हे पुस्तक असून त्याकडे पुस्तक म्हणून पहा, साहित्य म्हणून पहा, बालसाहित्य म्हणून पहा, वैचारिक पुस्तक म्हणून पहा, कादंबरी म्हणून पहा, नाट्य म्हणून पहा. हे सगळे साहित्याचे प्रकार आहेत, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना कोणत्याही प्रकारचा दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही; पक्षविरोधी कारवाया कराल, तर कारवाई अटळ! – संजय राऊत

दरम्यान, बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर काँग्रेस-भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण आरोप-प्रत्यारोप करण्याचे कारण नाही. कुंभमेळ्यात सुद्धा चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो लोक मरण पावले. गर्दी अनावर होते आणि नियंत्रण कोलमडून जाते. खरे म्हणजे लोकांनी सुद्धा शिस्त पाळली पाहिजे. प्रत्येक वेळा सरकारवर टाकून चालणार नाही. लोकांनीही शिस्त पाळली पाहिजे. इतक्या प्रचंड गर्दीमध्ये शासकिय यंत्रणा कोलमडून पडते. हे जगभरात घडते. दुर्दैव आहे की क्रिकेटच्या निमित्ताने ही चेंगराचेंगरी झाली, असे राऊत म्हणाले.

18 वर्षांच्या प्रतीक्षेला 18 तासांतच लागले गालबोट, बंगळुरूच्या विराट स्वप्नपूर्तीनंतर क्रिकेट जगतावर कोसळली शोककळा