
अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱयांची गय केली जाणार नाही, असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
बीड जिह्यातील काही रुग्णालयांत महिला ऊसतोड कामगारांच्या अवैध व अनावश्यक गर्भ पिशव्या काढल्या जात असल्याबाबतची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. शासनाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच शस्त्रक्रिया होतील याबाबत दक्ष राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच अवैध गर्भ पिशव्या काढल्याच्या तक्रारीचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत निर्देश दिले. तसेच सर्व वैद्यकिय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय स्तरावरसुद्धा गर्भाशय शस्त्रक्रियेस परवानगी देण्याबाबत शहानिशा करा, असे त्यांनी सांगितले.