मुंबईत राहून मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे; अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केला मराठीबाबत आदर

राज्यात हिंदी सक्ती लादण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे. मात्र, या सक्तीविरोधात राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वादाबाबत अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया देत मराठीबाबतचा आदर व्यक्त केला आहे. मुंबईत राहून मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे, असे त्याने म्हटले आहे.

मी कर्नाटकचा आहे म्हणून मला मराठी येत नाही. मात्र, मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला तर चाहत्यांना ते आवडते. मला मराठी नाही आली तर दुसऱ्यांना नाहीतर मला त्रास झाला पाहिजे. मला मराठी येत नसल्याची लाज वाटिली पाहिजे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायचे आहे, असेही त्याने म्हटले आहे. यातून सुनील शेट्टीने मराठी भाषेबद्दल असलेला आदर दाखवून दिला आहे. त्याच्या या वक्तव्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

माझी जन्मभूमी कर्नाटक असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. मी इथे काम करतो, इथं मी वाढलोय. त्यामुळं मला मराठी येणं गरजेचं आहे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायची आहे, असेही तो म्हणाला.