
भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले. बलरामपूर-बहरीच राष्ट्रीय महामार्गावर चकवा गावाजवळ गुरुवारी ही घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून फरार चालकाचा शोध घेत आहेत.
कारमधील सर्वजण एकाच कुटुंबातील असून लग्नसमारंभाला गेले होते. तेथून परतत असताना बलरामपूर-बहरीच राष्ट्रीय महामार्गावरील चकवा गावाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आदित्यराज (12), शिव कुमार (23), फूल बाबू (36), विजय गौतम (40) अशी मृतांची नावे आहेत. तर सीताराम, विकास गौतम, विनय कुमार, किशोर कुमार, गोपाळ, विकास आणि विनोद अशी जखमींची नावे आहेत.