राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाच्या जे पोटात आहे तेच ओठावर आले आहे. भैयाजी जोशी यांच्या विधानावरून आरएसएस, भाजपचा मुंबईला तोडण्याचा डाव अधोरेखित झालेला आहे, असा घणाघात युवासेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानभवन येथे माध्यमांशी बोलताना केला.
            
		





































    
    


























