
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत सात लाखांहून अधिक नवमतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवमतदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर नवी नोंदणी केली असल्याने नियमानुसार त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेली मतदार नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एक लाख ईव्हीएम मशीन्स वापरण्यात आले होते. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी याशिवाय अतिरिक्त मशीन्स वापरली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यासाठी इतर राज्यांची मदत घेण्याची तयारीही सुरू असल्याचे समजते.
कायदा म्हणतो…
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कायद्यानुसार निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकांसाठी वापरली जाणारी अंतिम मतदार यादीच वापरली जाते. त्यामुळे आगामी काळात राज्यात होणाऱया महापालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी ही यादी वापारली जाणार आहे.
– विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात एकूण 9 कोटी 73 लाखांच्या घरात मतदार संख्या होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर हा आकडा जवळपास 9 कोटी 80 लाखांवर पोहचला असून सुमारे सात लाख नवमतदारांना याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.