
कर्नाटकातील बंगळुरू शहरात एका तरुण पती पत्नीने आपल्या पाच व दोन वर्षांच्या मुलांना विष पाजले. त्या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर या दाम्पत्याने देखील गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं.
अनुप कुमार (38) आणि राखी (35) असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे होते. अनुप बंगळुरू मध्ये एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर कन्स्लटंट होता. तर राखी गृहिणी होती.
सोमवारी सकाळी अनुप कुमार यांच्या घरी काम करणाऱ्या बाईने दरवाजा ठोकवला. मात्र बराच वेळ दरवाजा न उघडल्याने तिने त्यांना कॉल केला. मात्र दोघांनीही फोन उचलला नाही. त्यामुळे तिने याबाबत शेजाऱ्यांना सांगितले व त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी येताच त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी अनुप राखी छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले. तर दोन्ही मुलं मृतावस्थेत जमिनीवर पडलेली होती.