नोकरी गेली अन् लग्नही मोडले!पोलिसांच्या चुकीमुळे तरुणाला मनस्ताप

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासातील मुंबई पोलिसांच्या चुकीचा मोठा मनस्ताप छत्तीसगढच्या तरुण व त्याच्या पुटुंबीयांना सोसावा लागला आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोर म्हणून आकाश कनौजियाला अटक केली होती, मात्र दुसऱयाच दिवशी शरीफुल मोहम्मद हा खरा हल्लेखोर जाळ्यात सापडला. त्यानंतर पोलिसांना आपली चूक लक्षात येताच आकाशला सोडले, पण या कारवाईने आकाशचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याची नोकरी गेली तसेच लग्नही मोडले.

सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी चापूहल्ला झाला. या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने मुंबई पोलिसांनी तपासाला गती दिली. यादरम्यान एका पोलीस पथकाने आकाश कनौजियाला संशयित हल्लेखोर म्हणून ताब्यात घेतले होते. तो खरा हल्लेखोर नसल्याचे पोलिसांना दुसऱया दिवशी कळले आणि आकाशला सोडून दिले. केवळ चेहऱयात साम्य दिसल्याने पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले होते. त्याचा मोठा मनस्ताप आकाश व त्याच्या पुटुंबीयांना सहन करावा लागला आहे. पोलिसांना साधा ‘मिशी’चा फरक लक्षात कसा आला नाही? मला मिशी आहे, तर सैफच्या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीला मिशी नव्हती. हा फरक लक्षात न घेताच पोलिसांनी मला अटक केली, अशी नाराजी आकाशने व्यक्त केली.