
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी करतो. ते म्हणाले की, मी पंतप्रधानांना विनंती करतो की, त्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर करून त्यांना हा सन्मान द्यावा.
दरम्यान, बुधवारी राहुल गांधी यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांनी त्याला शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली असल्याचं राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, पीडित कुटुंबाने मला पंतप्रधानांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवण्यास सांगितले की, आमची मुले शहीद झाली आहेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे.
पहलगाम हमले में मारे गए लोगों के परिवारों के दुख में, शहीद के दर्जे की उनकी मांग में, मैं साथ खड़ा हूं।
प्रधानमंत्री से आग्रह है कि वो इस त्रासदी में जान गंवाने वालों को यह सम्मान देकर उनके परिवारों की भावना का आदर करें। pic.twitter.com/auMEehEnOO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2025