
हिंदुस्थान -पाकिस्तानातील युद्धसदृष्य़ परिस्थिती सध्या निवळली आहे. मात्र तरीही हिंदुस्थानी सैन्य अलर्ट मोडवर आहे. याच पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगोने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही विमान कंपन्यांनी मंगळवारी काही शहरांना जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, चंदीगड आणि राजकोटसह काही शहरांमधील उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले आहे. एअर इंडियानेही सोशल मीडियाद्वारे उड्डाण रद्द करण्याबाबत माहिती दिली आहे.
इंडिगोने एक्सवरील फ्लाइट रद्द करण्याबाबत एक पोस्ट शेअर केली. “तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. 13 मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथून येणाऱ्या विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे तुमच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो. मात्र आमची टीम या निर्णयावर विचार करत आहे. आम्ही लवकरच तुम्हाला अधीक माहिती देऊ, असे त्यानी पोस्टमध्ये म्हंटले आहे.
#6ETravelUpdate pic.twitter.com/KnJYNZgOhF
— IndiGo (@IndiGo6E) May 12, 2025
एअर इंडियाने केली आठ शहरांची उड्डाणे रद्द
एअर इंडियाने राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, गुजरात आणि इतर काही राज्यांमधील उड्डाणे रद्द केली आहेत. “नवीन घडामोडी लक्षात घेता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देता, मंगळवार, 13 मे रोजी जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तुम्हाला पुढील माहिती देत राहू, असे ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
#TravelAdvisory
In view of the latest developments and keeping your safety in mind, flights to and from Jammu, Leh, Jodhpur, Amritsar, Bhuj, Jamnagar, Chandigarh and Rajkot are cancelled for Tuesday, 13th May.We are monitoring the situation and will keep you updated.
For more…
— Air India (@airindia) May 12, 2025
पाकिस्तानने अलीकडेच युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, परंतु त्यानंतरही त्यांच्या कारवाया थांबत नाहीत. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.