
>> वृषाली साठे
सीतामाई अशोक वाटिकेत गेल्यानंतर त्यांना रावणाच्या मायावी शक्तीचा अनुभव येतो. रावणाने छळ केलेल्या अनेक स्त्रिया-बालकांची पीडा त्यांना समजते. त्यांच्या मनचक्षुसमोर न पटणारी दृश्ये दिसतात. कारण रावण त्यांच्या बुद्धीचा ताबा घेऊ पाहत असतो. पण जर मनामध्ये राम आणि तनामध्ये रामनाम असेल तर अशा सीतामाईच्या मन-बुद्धीला कोण हरवू शकेल?
सीतामाई अशोकवनात येऊन अशोकाच्या झाडाला टेकून बसल्या. त्यांनी दोन घोट पाणी प्यायले. आता सरळ ध्यानात जाऊन स्वतच्या विचारांवर ताबा मिळवायचा ठरवले. सीतामाई ध्यानाला बसल्या. पण त्यांचे डोके प्रचंड दुखू लागले. मन संभ्रमित झाले. त्या जागरुक अवस्थेत राहू शकत नव्हत्या. ध्यान नीट का लागत नाही, सीतामाईला कळेनासे झाले. त्यांचे मन एवढे विचलित का झाले? का त्यांच्या विचारात स्पष्टता नाही?
यावेळेस मला श्रीरामांशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांना वाटले. ‘श्रीराम श्रीराम!’ त्यांनी जप सुरू केला. यापूर्वी त्यांनी असा जप केला असता, त्यांचा श्रीरामांबरोबर संपर्क स्थापन होऊन त्यांना सूचना मिळत असे. मात्र या वेळेस मात्र त्यांना काही सूचना मिळाली नाही.
एक क्षण त्यांच्या मनात वाईट विचारदेखील आला की श्रीरामांचे काही बरेवाईट तर झाले नसेल ना. पण दुसऱ्याच क्षणी मृत्यू आम्हा दोघांना वेगळे करू शकत नाही हा विचार आला. असे कित्येक तास जातात. पण सीतामाईचा श्रीरामांशी संपर्क होत नाही. त्यांना त्यांच्या भ्रमित मानसिक अवस्थेबद्दल आश्चर्य वाटतं. मग त्यांना आठवलं की, त्या दोन घोट पाणी प्यायल्या होत्या आणि त्यानंतरच त्यांची अशी अवस्था झाली. त्या पाण्यातून रावणाने मायावी शक्तीचा नक्कीच प्रयोग केला आहे. त्या सतर्क होऊन विचार करतात. रावण केवळ अन्न आणि पाण्यातूनच त्यांना मायावी शक्तीने त्रास देऊ शकतो आणि म्हणूनच जोपर्यंत लंकेत आहोत तोपर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करायला हवा. पण प्यायलेल्या पाण्याचा प्रभाव कमी होत नव्हता.
सोमा ही गोष्ट सांगताना सीतामाई चांगले उद्दिष्ट घेऊन लंकेत आल्या होत्या हे सांगते. त्यांना रावणाच्या मनातून राग, घृणा, मत्सर, काम हे काढून त्याच्या मनात दडलेल्या प्रेमाला बाहेर काढायचे होते. पण सीतामाईंना याची कल्पना नव्हती की रावण मायावी शक्तीचा दुरुपयोग करून त्यांची बुद्धी नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू शकतो. रावण तर खूप खुश होता. त्याला सीतामाईंकडे असलेल्या आध्यात्मिक शक्तींची कल्पना होती. अशा स्त्री ला जर तो विचलित करू शकतो, तर तो त्याचा खूप मोठा विजय होता. आता ही लढाई रणांगणावर न होता दोन मनबुद्धिंमध्ये चालू झाली होती आणि या मानसिक युद्धात पहिलं आक्रमण रावणाने केलं होतं.
सीतामाईंना हळूहळू अंधाराकडे जात होत्या. काही वेळानंतर त्यांना जमीन दिसली. पण त्यावर जिवंतपणाची एकही खूण नव्हती. जळलेली झाडं, रखरखीत नद्या होत्या. लाव्हारस ओकणारे पर्वत होते. त्यांचा लाल प्रकाश सर्वत्र पसरला होता. त्यांना तिथून बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. शेवटी सीतामाई रागाने म्हणाल्या, ही कोणती मृत जागा आहे. तेवढय़ात त्यांना पायाखाली काहीतरी जाणवलं. खाली त्यांना खूप प्रेतं पडलेली दिसली. तेही हात, पाय कापलेल्या विचित्र अवस्थेत होती. ती विद्रूप स्थिती बघून सीतामाई थोडय़ा मागे सरकल्या. ती प्रेतं मदताची याचना करू लागली. सीतामाई विचारलं, ही तुमची अवस्था अशीकशी झाली? ती प्रेतं उठून उभी राहिली. तेव्हा सीतामाईला दिसतं की ती सर्व स्त्रियांची प्रेतं आहेत. त्यांच्यावर खूपच अत्याचार झाले आहेत. त्यांच्या शरीराची अवस्था खूपच वाईट आहे आणि ही अवस्था रावणाने केली आहे. ती सर्व प्रेतं सीतामाईला आम्हाला मदत करा, असं सांगू लागली.
सीतामाई प्रत्येक प्रेताजवळ जाऊन त्यांच्या चेहऱयावरून हात फिरवून त्यांना शांती प्रदान करत म्हणाली, हे मुलींनो मला तुमचं दुःख घेऊ द्या. नंतर अतिशय रागाने सीतामाई रावणाला उद्देशून म्हणाल्या, हे रावणा, हे तू काय करून ठेवलं आहेस. जो पुरुष स्त्राrला वाईट वागवेल त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. सीतामाईच्या शापाने रावण तिथे प्रगट झाला आणि जोराजोरात हसत म्हणाला या स्त्रियांना माझ्या आनंदासाठीच मी निर्माण केलं होतं. तितक्यात सर्व दृश्य हवेत विरून गेलं. रावणही गायब झाला. त्याच्या हसण्याचा गडगडाट हळूहळू कमी होत गेला. सीतामाईला कळेना की हे सत्य आहे की आभास! रावणाने मायावी शक्तीने केलेला हा पहिला प्रहार होता.
नंतर सीतामाईंना एक सुंदर जंगल दिसतं. जंगलात त्यांना एका सुंदर झऱयापाशी श्रीराम दिसतात. त्यांना खूप आनंद होतो. त्या धावत श्रीरामा जवळ जातात आणि पाहतात की एक सुंदर स्त्राr श्रीरामांजवळ पहुडली आहे. श्रीराम तिच्या बटांशी खेळत तिला सांगत आहेत की, सीतेचा मृत्यू झाला आहे. आता तूच अयोध्येची महाराणी होणार! सीतामाईला हृदयात भयंकर वेदनेची कळ जाणवते. ते दृश्य नाहीसं होतं. सीतामाईंना पुढच्या दृश्यात अयोध्येचा राजमहाल दिसतो. श्रीराम सिंहासनावर बसले आहेत आणि तीच सुंदर स्त्राr त्यांच्या शेजारी बसली आहे. सीतामाई रडत सांगते, श्रीरामा मी जिवंत आहे. पण त्यांचा आवाज रामापर्यंत पोहोचत नाही. सीतामाई रडत गुढघ्यावर बसतात. त्यावेळी त्यांना रामाच्या जागी रावण दिसायला लागतो आणि तो पुन्हा जोराजोरात हसायला लागतो. ते हसणे ऐकून सीतामाई स्वतच्या कानावर हात ठेवतात आणि तोंड फिरवतात. बघावं तिथे त्यांना रावण एका सुंदर स्त्राrबरोबर दिसतो. तो त्या सुंदर स्त्राrला त्रास द्यायला सुरुवात करतो. ती स्त्राr रावणापासून स्वतला सोडवायचा प्रयत्न करते. पण रावण त्या स्त्राrचा खूप छळ करतो. सीतामाईंना ते दृश्य बघवत नाही. त्या या स्त्रियांचं दुःख स्वत अनुभवत असतात. ते दृश्य नाहीसं होतं. सीतामाईंना पुन्हा अंधाराचा विळखा पडतो. पण आता सीतामाई सतर्क असतात. कारण हा सर्व रावणाच्या मायावी शक्तीचा खेळ असतो. त्या अंधारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी एक काचेची भिंत समोर उभी राहते. त्या काचेवर रावणाचा विकट हास्य करणारा चेहरा असतो. सीतामाई धावून धावून दमतात आणि खाली जमिनीवर बसतात. त्यांना वाटतं की, त्या वसुंधरा मातेच्या जवळ आहेत. पण त्यांना माती हातात घेताच ती मृत माती जाणवते. त्या हताश होतात. तेही दृश्य बदलते. त्यांना आता श्रीराम अयोध्यामध्ये राजसिंहासनावर बसलेले दिसतात. त्यांच्या शेजारी दोन लहान बाळे असतात. सीतामाईंना आतून वाटतं की, ही दोन लहान बाळे त्यांची आणि श्रीरामांची आहेत. वात्सल्यभावनेने त्या बाळांना घ्यायला पुढे सरकतात. तितक्यात राम उठतात. तलवारीने दोन्ही बाळांची डोकी उडवतात. सीतामाई भयचकीत होतात. पण त्यांना हे भ्रमलोक असल्याचं कळून चुकतं. तेव्हा रामाच्या जागी त्यांना रावण दिसू लागतो. रावण सीतामाईकडे बघून विकट हसतो. सीतामाईची अवस्था बघून त्याला आनंद होतो.
पुन्हा दृश्य बदलतं. सीतामाईंसमोर अनेक लहान बालके मरून पडलेली दिसतात. त्यांच्या आया दुःखाने वेडय़ा झालेल्या असतात. मुलांची ही अवस्था बघून सीतामाई म्हणतात, कोण आहे हा रावण. ज्याला लहान मुलांचीदेखील दया येत नाही. तेव्हा त्यांना त्यांचा आंतरिक आवाज सांगतो की तोच रावण आहे, ज्याने पोटचा मुलगा प्रल्हादला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता. भ्रम का होईना, अशी दृश्य निर्माण करणारा रावण किती घाणेरडे विकृत विचारांचा आहे हे त्यांना कळतं. उद्या हे विकृत विचार तो कृतीतही आणू शकतो. आपल्याला त्याचा नाश करायलाच हवा. रावण मायावी शक्तीच्या साहाय्याने कोणाच्याही बुद्धीचा ताबा घेऊन असे विकृत विचार पेरू शकतो. ज्यामुळे पूर्ण मानव जातीचा विनाश होऊ शकतो.
भले ती रावणाने तयार केलेली मायावी दृश्ये होती, पण सीतामाईंनी पीडितांच्या वेदना अनुभवल्या. त्यांना वाटले की या जन्मासाठी मी खूप सहन केलं. आता माझी शक्ती संपली आहे. आता मी शून्यात विलीन होते. या विचाराने त्या शरीर त्याग करण्यास तयार होतात. तेव्हा त्यांना श्रीरामांचा मधुर आवाज ऐकू येतो, सीता अशी कुठलीही शक्ती या जगात नाही, जी तूला हरवू शकेल. रावणाचे असे विकृत विचार तूच थांबवू शकतेस. ती शक्ती केवळ तुझ्यात आहे. हे तुझेच अद्वितीय प्रेम आहे ज्यामुळे हे विश्व टिकून आहे. मी पण तुझ्याच प्रेमामुळेच आहे. श्रीरामांच्या आवाजासोबत सीतामाईंना प्रत्यक्ष श्रीराम दिसायला लागतात. त्यांच्या डोळ्यात बघताना त्या सर्व वेदना विसरून जातात. त्यांच्या संपूर्ण देहात, मनात, बुद्धीत केवळ रामनाम भरून जातं.