
>> लक्ष्मीकांत कुलकर्णी
सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महाम-‘डळाच्या धर्तीवर एसटी महामंडळांतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली असून, राज्यातील मिंधे सरकारने यामध्येही मराठवाड्यावर अन्यायाची परंपरा कायम ठेवली आहे. विदर्भात दोन तर मुंबई, पुणे, नाशिक येथे प्रादेशिक कार्यालय देताना छत्रपती संभाजीनगरला मात्र हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
राज्यातील प्रत्येक विभागासाठी असल ले प्रादेशिक कार्यालय बंद करून सरकारने संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांनाच याचे प्रमुख करण्यात आले. त्यानंतर 6 डिसेंबर 2016 पासून संनियंत्रण समित्या बरखास्त करण्यात आल्या. त्यानंतर आता कर्नाटकाच्या धर्तीवर सरकारने महामंडळाचेदेखील किमान 5 प्रादेशिक विभागांत विभाजन करावे, अशी संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानुसार आता है प्रादेशिक विभाग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि पुण्याला प्रादेशिक विभाग करताना छत्रपती संभाजीनगरला वगळण्यात आल आहे. मराठवाड्याला नाशिक प्रादेशिक विभागाशी जोडले गेल्याचे समजते.
स्थानिक पातळीवर बाहतुकीचे नियोजन करणे, यात्रा उरुस यासाठी जादा वाहत तूक करणे असे निर्णय घेण्यासाठी नियंत्रण नियोजन आणि समन्वयाच्या हेतूने महाम-ळांतर्गत 5 प्रादेशिक विभाग करण्यात आल आहेत. या विभागाअंतर्गत येणारे विभाग म्हणजे जिल्हे निश्चित करण्यात आले असून, त्याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. गही दरम्यान, प्रत्येक समितीसाठी आवश्यक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्या-त्या भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन राबवल ‘जाणार आहे. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.