
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्या लगतची जमीन खचल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असून तूर्त किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तरीही महाराष्ट्रभरातून शिवभक्त छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाच्या दर्शनाकरिता गर्दी करत आहेत.
शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर महिनाभरातच चबुतऱयालगतची जमीन खचली. त्यामुळे आवश्यक दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. यासाठी 22 जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तरी किल्ल्याच्या मागील बाजूने शिवपुतळा दिसत असल्याने तेथे पर्यटक गर्दी करून शिवपुतळ्याचे दर्शन घेत आहेत. आणखी किती दिवस दुरुस्तीचे काम चालणार आणि पर्यटकांसाठी किल्ला कधी खुला होणार याबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर दिले जात नाही. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी आणि रोष आहे.