आरबीआयने कामकाजाची वेळ दोन तासांनी वाढवली

आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने कामकाजाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे. म्हणजेच आरबीआयचे कामकाज आता सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालणार असून 1 जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे. आरबीआयच्या आर्थिक व्यवहारांचा आणि कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर राधा श्याम राठो यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारणी समूहाने आरबीआयच्या कामकाजाची वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.