
लामजना लातूर मार्गावर निलंगा तालुक्यातील तीन तरूण आपल्या मोटारसायकलने गावाकडे जात होते. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
निलंगा तालुक्यातील सरवडी येथील सोमनाथ दयानंद हिप्परगे (वय 22), अभिजित शाहूराज इंगळे ( वय 23), दिंगबर दत्ता इंगळे (वय 27,रा.सरवडी) हे तिघे मोटारसायकलने रविवारी रात्री 11 वाजता लातूरहून गावाकडे येत असताना करजगाव पाटी येथे अचानक समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या मोटासायकलला जोराची धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.