
कधीकधी नळाला दूषित पाणी येते. असं जर झालं तर ते पाणी पिण्यासाठी वापरू नका. कारण यामुळे पोटदुखी, अतिसार असे आजार होऊ शकतात.
महापालिका किंवा पाणीपुरवठा विभागाला तत्काळ संपर्क साधा. त्यांना समस्येची माहिती द्या, जेणेकरून ते तातडीने उपाययोजना करू शकतील.
चुकून जर दूषित पाणी आले तर किमान एक मिनिट पाणी उकळून घ्या. यामुळे जंतू नष्ट होतात. पाणी गढूळ असेल, तर ते स्वच्छ कापडाने गाळून घ्या आणि नंतर उकळा.
क्लोरीनच्या गोळ्या किंवा द्रावण वापरूनही पाणी शुद्ध करता येते. जर पाणी शुद्ध करणे शक्य नसेल, तर काही काळासाठी बाटलीबंद पाणी पिण्याचा पर्याय निवडा.
स्थानिक प्रशासनाने पाणीपुरवठय़ाची नियमित तपासणी करावी, दूषित पाणी सर्व इमारतीमध्ये आले की केवळ तुमच्या घरी आले, याचीसुद्धा चौकशी करा.


























































