संस्कृती सोहळा – माझ्या जिवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी…

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

भक्तिरसात न्हाऊन निघालेला देहू आळंदीतील वैष्णवांचा मेळा, खांद्यावर उंचच उंच डोलणाऱ्या भगव्या पताका, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा अखंड जयघोष, टाळ-मृदुंगाचा टिपेला पोहोचलेला गजर, अशा भक्तिमय वातावरणात आषावारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांसह पालखीने भूवैकुंठ फंडे प्रस्थान केले आहे. हा भक्तीचा अनुपम सोहळा स्वर्गातसुध्दा नाही, अशी समस्त विठ्ठलभक्तांची धारणा आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने…

‘पंचमीच्या सणाला, बंधू येईल न्यायला?’ नागपंचमीचा सण आला की सासुरवाशिणीला माहेरची ओलागते. दसरा-दिवाळी सणाला तर आई-वडील कधी एकदा नजरेला पडतील असे तिला वाटते. तद्वतच आषामहिना आला की वारी जवळ येते आणि वारकरी मंडळी ‘माझ्या जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ-मृदुंग घेऊन वारीच्या तयारीला लागतात. कधी एकदा त्या पांडुरंगाला डोळा भरून पाहीन अशी त्यांची आतुरता स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येते.

‘भेटीलागे जीवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिन वाट तुझी।’ पांडुरंगाच्या भेटीची ओढ मोठी विलक्षण असते. ही ओढ एकदा का मनाला लागली की मग रात्रंदिवस तहान भूक सारे काही हरवून जाते. वारकरी मंडळींच्या जिवाला केवळ पांडुरंगाच्या दर्शनाची व्याकुळता सतावीत राहते. अर्थात ही व्याकुळता सुखाच्या, समाधानाच्या संवेदनातून येते. खरं तर वारी सुरू होण्यापूर्वी ते मनाने पंपोहोचलेले असतातच. वारीमध्ये प्रपंचाची काळजी, चिंता सारी मिटून जाते. वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. विठ्ठलाचे गुणगान गाताना तो देहभान हरपतो, आनंदाने नाचतो, तेव्हा त्याला त्याचे वयाचे भानही नसते. स्त्री-पुरुष, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेदभाव गळून पडतो. एवढेच नव्हे, तर प्रत्येकाचा ‘मी’पणा या वारीत कुठल्या कुठे गडप होतो.

आषाढसरी कोसळत असतात, पावसाने बरसण्याचा हट्ट धरलेला असतो. शेतातली पेरणी, कोळपणीची मुख्य कामे झालेली असतात. शेतकऱ्याला थोडा निवांतपणा मिळालेला असतो. शिवारात आता कोणते बी पेरावे याचा विचार संपलेला असतो. आता केवळ पर्जन्यराजाची वाट पाहात बसायचे आणि वेळेवर पाऊस लागला की, समाधानाने सुस्कारा सोडायचा. नेमक्या याच वेळी चैतन्याचे बीज पेरत वारीची वाट चालायला शेतकरी उत्साहाने तयार होतो.

नदी जशी सागराकडे प्रस्थान करताना वाटेत भेटणाऱ्या अनेक गावांतील अवतीभवतीची जमीन सुपीक बनवत असते, त्याप्रमाणे वारकरी या विश्वचैतन्य विठ्ठलाकडे पायी जाताना वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक गावागावातील लोकांच्या हृदयपटलावर भक्तीचा आणि प्रेमाचा वर्षाव करतात. त्यामुळे वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावाला आणि गावकऱ्याला आनंदाचे उधाण येते. पंढरपूरला निघालेल्या पालखी, पादुकांचे व वारकऱ्यांच्या चरणकमलांचे दर्शन घेतले की आपण कृतकृत्य झालो असा भाव प्रत्येकाच्या मनात जागृत होतो. प्रत्येकजण एकमेकाला माऊली म्हणून मिठी मारतात, गळाभेट घेतात, पायावर नम्रपणे डोके टेकवतात. सर्वत्र सदा सम। ते आपणची अद्वैत ब्रह्म। ही संतोक्ती त्यांच्या हृदयपटलावर कायमची विराजमान झालेली असते. त्यांच्या भक्तिप्रेमातून अध्यात्म प्रकट होत असते. सद्गुण आणि सद्विचार हेच खरे ज्ञान. याची त्यांना पूर्णपणे जाणीव असते. ज्ञान हे जर ज्ञानाच्या पातळीवर राहिले तर अहंकार दुणावतो आणि ज्ञानाचे रूपांतर जर भक्तीत झाले तर जीवन अंतर्बाह्य चैतन्यमय होते. हे चैतन्यस्वरूप आनंदाचे डोही। आनंद तरंगची अनुभूती देतात. याकरिताच समस्त वारकरी पुंडलिक वरदा हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम.. विठ्ठल विठ्ठलच्या गजरात आनंदानुभूती घेत असतात. वाटेत झिम्मा फुगडीचा फेर धरतात. त्यांच्या रोमारोमात आनंदाचे कारंजे फुटतात.

वारकरी संप्रदाय हा भारतीय संस्कृतीतील अनेक भक्तिसंप्रदायांपैकी प्रमुख असा संप्रदाय आहे. पंचा पांडुरंग तथा श्री विठ्ठल हा या संप्रदायाचे उपास्य दैवत आहे. विठ्ठल म्हणजे भेदभावाचा अभाव, विठ्ठल म्हणजे स्वार्थ-लोभ-अहंकाराचा लोप, विठ्ठल म्हणजे प्रेमाची मूर्ती आणि दया-क्षमा शांतीचे प्रतीक! समता-बंधुता आणि प्रसन्नता या सर्व गुणांचा संगम विठ्ठलापाशी पाहायला मिळतो. येथे सगुण-निर्गुणाच्या रेषा पुसल्या जातात. तामस, राजस व सात्त्विक भावही संपलेले असतात. केवळ विठ्ठलाच्या ओदिव्य आनंदात वारकरी वारीची वाट चालत असतात.

महाराष्ट्रामध्ये उगम पावलेली वारकरी संप्रदायरूपी जीवनगंगा शतकानुशतके जिवंतपणे वाहत आहे. विद्यमान युगातही तिचा पावन प्रवाह जोमाने वाहात राहणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयमंदिरात तिने जिव्हाळ्याचे स्थान संपादन केले आहे. सद्धर्म आणि सदाचाराच्या शिकवणुकीमुळे ती श्रेष्ठ जीवनमूल्यांचे रक्षण व पोषण करीत आहे.

वारकरी संप्रदायामध्ये ‘वारी’ हे एक व्रत आहे. तसाच तो एक संस्कारसुध्दा आहे. वारकऱ्यांच्या अट्टहासाने जोडलेला तो सद्गुणही आहे. वारी म्हणजे एकात्मतेची आणि समतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवत् भक्तीचा नुसता आविष्कार नाही, तर भक्तिरूपी प्रेमसुखाचा आणि मुक्तिरूपी आत्मानंदाचा स्वर्गीय सुखद अनुभव आहे.

आषाकार्तिकी, चैत्री व माघी या पंच्या मुख्य वाऱ्या होत. या वारीकरिता जाणे ही वारकऱ्यांची बाह्य क्रिया होय. वारी हा वारकऱ्यांचा एक मेळाच आहे, त्याचे रसिकपणे केलेले वर्णन वारकरी संप्रदायाला अधिक भावलेले दिसते. भागवत संप्रदाय अर्थात वारकरी पंथाची शिकवण तशी साधी व सहज सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय नीती व सदाचाराने करावा आणि हे करताना पांडुरंगाचे नाम घ्यावे, हीच खरी भक्ती.

वारीतून भक्तीचा सुगंध तर दरवळत असतोच, पण एकमेकांची विचाराची, एकतेची व समतेची शिदोरी ही एकत्रित करून ती एकमेकाला प्रेमभराने व ममतेने भरवली जाते. वारी हा आता केवळ वारकऱ्यांचा सोहळा राहिलेला नाही, तर तो विश्वव्यापी सोहळा झाला आहे. अलीकडे पर्यावरणाची वारी, समतेची वारी अशा नामाभिधानातून समकालीन सामाजिक प्रश्नावरही जागरण केले जाते. स्त्राr-भ्रूणहत्या, प्लॅस्टीक बंदी, स्वच्छ भारत मोहीम, सेंद्रिय खतांची जागृती, जातीयता निर्मूलन, पर्यावरण रक्षण अशा विविध विषयांवर जनजागरणसुद्धा वारीत घडविले जाते. अध्यात्मिक सुखाचा हा आनंदसोहळा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि पुसुरू राहणार आहे. कारण जगद्गुरू संत तुकोबारायांनीच सांगितले आहे.

‘विष्णुपद, गया, रामधाम काशी।

अवघी पायांपाशी विठोबाच्या।

तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस।

तत्काळ या नास अहंकाराचा।’

प्रत्यक्ष विष्णूच्या पदस्पर्शाने पावन झालेले गयाक्षेत्र तसेच, प्रभू रामचंद्राचे धाम म्हणून ओळखले जाणारे काशी क्षेत्र अशी सगळीच तीर्थक्षेत्रे पंढरपुरातील या विठोबांच्या पायापाशी वाहत असलेल्या चंद्रभागेत विराजमान आहेत. तेव्हा अशा सामर्थ्यशाली देवाच्या देवळाच्या नुसत्या कळसाचेही दुरून दर्शन झाले तरी जिवाला मोक्ष मिळतो. आणि जन्मोजन्मीच्या अहंकाराचाही नाश होतो, असा हा पंचा विठ्ठल वारीत अनुभवणे म्हणजे ‘सर्व सुखाचे आगर। बाप रखुमादेवीवर।’ होय.

 [email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)