जागर – उत्तरेमुळे बिघडतेय चेन्नईची हवा!

>> भावेश ब्राह्मणकर

राजकीय वैर आणि सत्ताधाऱयांमधील मतभेदांमुळे दिल्ली आणि चेन्नई यांचे नाते विळय़ाभोपळय़ाचे आहे. त्यामुळे उत्तर-दक्षिणेतील वाद नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता तर उत्तरेमुळे चेन्नईची हवा बिघडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

केंद्रातील भाजप सरकार आणि तामीळनाडूतील डीएमके सरकार यांच्यातील वाद बहुचर्चित आहे. राज्यपालांची भूमिका आणि वर्तन असो की प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश किंवा जीएसटीच्या थकीत रकमेचे वितरण अशा विविध पातळय़ांवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद आहेत. तमीळ अस्मिता विरुद्ध उत्तरेचे राजकारण असाही पदर त्यास जोडला जातो. गेल्या अनेक दशकांपासून उत्तर विरुद्ध दक्षिण असे चित्र रंगते आहे किंवा रंगविण्यात येते. त्यातही भारतीय जनता पक्षाकडून प्रादेशिक पक्षांना अडचणीत आणण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही डीएमके पक्षाकडून केला जातो. अशातच एका संशोधन अहवालाने अनेकांची झोप उडविली आहे. पर्यावरणविषयक हा अहवालसुद्धा उत्तर विरुद्ध दक्षिण वादाला वेगळीच फोडणी देणारा आहे.

आयआयटी चेन्नईमधील सिव्हिल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक डॉ. चंदन सारंगी आणि भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय मेहता यांनी ‘अॅटमॉस्फेरिक केमिस्ट्री अँड फिजिक्स जर्नल’मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, उत्तर भारतात वाहनांसह विविध कारणांमुळे होणाऱया वायुप्रदूषणामुळे चेन्नईची हवा बिघडते आहे. यास कारणीभूत आहेत एरोसोल. हे म्हणजे सूक्ष्म तुषार किंवा धुक्यासारखा पदार्थ. उत्तर भारतात उत्सर्जित होणारे एरोसोल पावाती वाऱयांच्या अभिसरणामुळे आग्नेय किनारा आणि बंगालच्या उपसागराकडे वाहून नेले जातात. खासकरून डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडतो. हे एरोसोल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चार ते पाच किमी उंचीपर्यंत वातावरणाच्या उष्ण रचनेत बदल घडवून आणतात. यामुळे चेन्नई आणि परिसरातील किनारी प्रदेशात पीएम 2.5 या प्रदूषित घटकाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते.

हवामान विभागाच्या कोलकाता, भुवनेश्वर, विजागपटम, चेन्नई आणि चेन्नईच्या दक्षिणेकडील शहर कराइकल येथील केंद्रात नोंद झालेला वरच्या हवेतील रेडिओसोंड मोजमापाचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला. कोलकाता, भुवनेश्वर आणि चेन्नईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये वाहून आलेल्या एरोसोलचा हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम हा विजागपटम आणि कराइकलसारख्या लहान शहरांपेक्षा जास्त आहे. कारण, महानगरांमध्ये स्थानिक प्रदूषणही असते. चेन्नईच्या बाबतीत, उत्तर भारतातून वाहून नेल्या जाणाऱया एरोसोलमुळे पीएम 2.5 च्या प्रमाणात 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होते, असे डॉ. मेहता सांगतात.

उत्तर भारतातून एरोसोलच्या वाहतुकीमुळे कोलकाता येथील तापमानात होणारी सापेक्ष वाढ 300 मीटर उंचीपासून सुरू होते आणि 2 किमीपर्यंत वाढते. भुवनेश्वर आणि विजागपटममध्ये ते 500 मीटर उंचीपासून सुरू होते आणि 2.5 किमीपर्यंत वाढते. चेन्नई आणि कराइकलच्या बाबतीत ते 500 मीटर उंचीपासून सुरू होते आणि 3 किमीपर्यंत वाढते. कोलकाता ते चेन्नई आणि कराइकल येथे वाहून आलेल्या एरोसोलमुळे वातावरणातील तापमान वाढते, मात्र ज्या दिवशी उत्तर भारतातून एरोसोलची वाहतूक होत नाही, त्या दिवशी कोलकाता, भुवनेश्वर आणि विजागपटमच्या बाबतीत मिश्रण थराची (मिक्सिंग लेयर) उंची 1.5 किमी ते 2 किमीदरम्यान असते. तर चेन्नई आणि कराइकलमध्ये 2 किमी ते 2.5 किमीदरम्यान असते. जी नंतर कोलकाता, भुवनेश्वर आणि विजागपटमसाठी 300-400 मीटर आणि चेन्नई आणि कराइकलसाठी 500 मीटर ते 1 किमीपर्यंत कमी होते.

उदाहरणार्थ 24 ते 27 जानेवारी 2018 रोजीच्या नोंदी पाहता येतील. या दिवसांमध्ये उत्तर भारतातून चेन्नईला एरोसोलची वाहतूक झाली. तेव्हा स्वच्छ दिवसांच्या (23 जानेवारी आणि 28-29 जानेवारी) तुलनेत संशोधकांना असे आढळून आले की, 1 किमी ते 2.5 किमी उंचीच्या दरम्यान वाहून नेलेल्या एरोसोलची संख्या 50-60 टक्के जास्त होते आणि 24 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान ची उंची 1.4 किमी वरून फक्त 300 मीटर (78 टक्के घट) पर्यंत कमी झाली. चेन्नई आणि कराइकल या दोन्ही ठिकाणी 3 किमीपर्यंत तापमानवाढ होते. यावरून असे सूचित होते की, एरोसोलमुळे होणारे तापमानवाढ केवळ एरोसोलच्या उंचीवर तापमान वाढवत नाही तर पृष्ठभागाजवळील हवेच्या तापमानावरदेखील परिणाम करू शकते.

डॉ. सारंगी सांगतात की, “आमच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, चेन्नईमध्ये हवा गुणवत्तेच्या व्यवस्थापनात उत्तरेकडील एरोसोलच्या वाहतुकीचा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारचे प्रादेशिक उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरण आखणे आवश्यक आहे. विशेषत उत्तर-दक्षिण प्रवाहाच्या तीव्र हंगामात ते अत्यंत गरजेचे आहे. अचूक हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजासाठी एरोसोल-रेडिएशन परस्पर संवादाचा समावेश असलेल्या एकात्मिक मॉडेलिंग फ्रेमवर्कची आवश्यकता आहे.” विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समोर आलेली ही तथ्ये आपण नक्कीच नाकारू शकत नाहीत. हवा, तापमान किंवा एरोसोल यांना मानवी भांडण किंवा मतभेद कळत नाहीत, मात्र उत्तरेकडील प्रदूषित घटक थेट आग्नेय भागातील शहरांच्या हवा गुणवत्तेवर परिणाम करीत असल्याने वायुप्रदूषणाबाबत आपण खडबडूनच जागे व्हायला हवे. कारण, हवेला आकाशात कुठलीही मर्यादा नाही.

डॉ. सारंगी आणि डॉ. मेहता यांनी या संशोधनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 2015 ते 2024 अशा एकूण 10 वर्षांच्या कालावधीतील माहिती आणि आकडेवारीचा सखोल अभ्यास केला आहे. चेन्नईच्या एसआरएम इन्स्टिटय़ूटमधील लिडार सेन्सरद्वारे एरोसोलचा, रेडिओसोंडद्वारे तापमान, आर्द्रता आणि हवेचे वस्तुमान, तर अमेरिकन आणि वाणिज्य दूतावासात दर तासाला नियमितपणे घेतले जाणारे पीएम 2.5चे आकडे अभ्यासात उपयुक्त ठरले आहेत. चेन्नईच्या हवेतील विविध घटकांचे प्रमाण तपासण्यात आले. त्यातील एरोसोलचा विशेष अभ्यास करण्यात आला. ज्या दिवशी उत्तर भारतातून वाहून नेले जाणारे एरोसोल आग्नेय किनाऱयावर पोहोचतात आणि 5 किमी उंचीपर्यंत पोहोचतात त्या दिवशी एरोसोलचे प्रमाण जास्त असते, तर इतर दिवसांत एरोसोल 1.5 किमीपेक्षा कमी उंचीवर मर्यादित असतात. एरोसोल हे सूर्यकिरण आणि जुने सेंद्रीय कार्बन शोषून घेतात तसेच काळा कार्बन साठवतात. एरोसोल पृष्ठभागावरील तापमानात घट घडवून आणतात तसेच ते आढळणाऱया उंचीभोवती जास्त तापमान वाढवतात. स्वच्छ दिवसात वातावरणातील एरोसोल पृष्ठभागावर थंडावा निर्माण करतात, परंतु या संशोधनात असे आढळून आले की, ज्या दिवशी उत्तर भारतातून वाहून नेले जाणारे एरोसोल पूर्व किनाऱयावर पोहोचतात त्या दिवशी पृष्ठभागावरील थंडावा प्रति चौरस मीटर 20 ते 40 वॅट्सने वाढतो. डॉ. सारंगी म्हणतात की, “जसे उंचीवर जावे तसे तापमान कमी होत जाते, परंतु एरोसोलच्या प्रादेशिक वाहतुकीमुळे गतिशीलता बदलते. ज्यामुळे वातावरण जास्त उंचीवर तुलनेने गरम होते आणि पृष्ठभागावर थंड होते. यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणातील उष्णता यांच्यातील अदलाबदल कमकुवत होते. यातूनच संवहन प्रािढयेत अडथळा येतो.”

[email protected]
(पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार.