Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे

रत्नागिरीमधील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर मुळे सापडत असल्याची माहिती मिळताच खवय्यांनी मुळे पकडण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. ही बातमी सगळीकडे पसरताच अनेक जण समुद्राकडे धाव घेत आहेत. हे मुळे निळ्या रंगाचे असतात म्हणून स्थानिक लोकांनी त्याला चायना मुळे असे नाव ठेवले आहे. मात्र हे निळ्या रंगाचे मुळे रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक ठिकाणी सापडतात. मासळीबाजारातही मासेविक्रेत्या महिला हे निळ्या रंगाचे मुळे 100 ते 150 रूपये या दराने विकतात. मात्र चायना मुळे सापडल्याची बातमी सर्वत्र पसरल्याने समुद्रात काहीतरी समुद्री खजिना सापडला असे अनेकांना वाटले त्यामुळे काही हौशी मंडळींनी भाट्ये समुद्र किनारी गर्दी केली आहे.

कोकणात जसे तसरे मुळे सापडतात तसेच हे मुळे आहेत. मात्र त्यांचा रंग निळा व शिंपल्यांना चकाकी असल्याने स्थानिक लोकांनी त्याला चायना मुळे नाव ठेवले आहे. मात्र हे मुळे चायनावरून येत नाही तर रत्नागिरीच्या समुद्रकिनारी सर्रास सापडतात.