काँग्रेसने 70 वर्षात काय केलं? पंतप्रधानांच्या प्रश्नाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर

पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी कायम काँग्रेसवर टीका करताना गेल्या 70 वर्षात काँग्रेसने देशासाठी काय केलं? असा प्रश्न विचारतात. पंतप्रधानांच्या या प्रश्नाला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधानांना उत्तर देत भाजपवर देखील निशाणा साधला आहे.

”पंतप्रधान नेहमी विचारतात – 70 वर्षात काय केलं??? आम्ही देशाला आतापर्यंतची सर्वाधिक बेरोजगारी दिली नाही, आम्ही देशाला आतापर्यंतची सर्वाधिक महागाई दिली नाही. भाजपचे सरकार हे शेतकरी, तरुण व महिलांचे सरकार नाही. हे सरकार फक्त 5 ते 6 श्रीमंत लोकांसाठी आहे. ती लोकं देशातील कोणत्याही व्यवसायावर मक्तेदारी करू शकतात”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी हे सध्या कन्याकुमारी ते कश्मीर दरम्यान ‘भारत जोडो” यात्रा घेत आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधीकडून सत्ताधारी भाजपवर सतत टीका केली जात आहे.