
खरीप हंगामातील भातासह कापूस, सोयाबीन, तूर आदी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. तांदळाला क्विंटलमागे 2,369 इतका दर निश्चित करण्यात आला आहे. यात 69 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कापसाच्या दरात 589 रुपयांची वाढ करण्यात आली असून क्विंटलमागे कापसाचा भाव 6,710 रुपयांवर गेला आहे. तूरडाळीच्या आधारभूत किमतीत 450 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर उडीद डाळीच्या किमान आधारभूत किमतीत 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मूगडाळीच्या किमान आधारभूत किमतीत 86 रुपयांची झाली आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर दोन लाख सात हजार कोटींचा भार पडेल, अशी माहिती पेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.