
पुणे जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींची पायपीट आता बंद होणार आहे. जिल्हा परिषदेने सायकल बँक उभी करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विद्यार्थिनींना आठवीचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत मोफत सायकल दिली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू केली जाणार आहे
जिल्हा परिषद सायकल बँक स्थापन करणार आहे. यामध्ये जमवणाऱ्या सायकली या पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना दिल्या जातील. जोपर्यंत त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, तोपर्यंत या सायकली त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी घरी दिल्या जातील. आठवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही सायकल त्यांना पुन्हा संबंधित शाळेच्या सायकल बँकमध्ये जमा करावी लागेल.
या सायकल बँकविषयी माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, ‘मुलींचे शालेय शिक्षण व्हावे. तसेच त्यांची शाळेमधील उपस्थिती वाढावी. घर ते शाळा हे अंतर लांब असल्याने अनेकदा शाळेमध्ये येण्यासाठी उशीर होतो म्हणून मुली शाळेत येण्याचे टाळतात.
पाचवी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्या सुमारे ३५ हजारांपर्यंत आहे. तेवढ्या प्रमाणात सायकली सायकल बँकमध्ये उपलब्ध करून दिले जातील. प्रामुख्याने सीएसआर त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास काही प्रमाणात जिल्हा निधी यासाठी खर्च केला जाईल. या सर्व सायकली। या जिल्हा परिषदेच्या असतील. शाळामार्फत त्या विद्यार्थिनींना दिल्या जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.
स्मार्ट स्कूल ही संकल्पना जिल्हा परिषद शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. गुणवत्ता वाढ आणि शैक्षणिक सुविधा तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयल केले जागावण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सायकल बँकच्या माध्यमातून मोफत सायकल दिली जाईल. त्यामुळे मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढेल, तसेच वेळेची बचत होऊन हा वेळ त्यांना अभ्यासासाठी मिळू शकेल. गजानन पाटील