खऱ्या संस्कारांना आपोआप मूल्य प्राप्त होते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. समिरा गुजर-जोशी

रे रङ्ग हेमकल्या तुलितो? सि नूनं । मानं जहीहि किमु पश्यसि नो विशेषम् ।
स्वर्णं हि रत्नखचितं नृपशेखरेषु । त्वं पाप पामरवधूचरणेषु लीन ।।
या श्लोकात कवी पितळ या धातूला उद्देशून म्हणतो-अरे पितळ धातू, तू स्वतला सोन्यासमान समजतोस; हा तुझा अभिमान सोड. तुला सोन्याचा विशेष लक्षात कसा येत नाही? जरा पाहून तरी घे-रत्नांनी जडवलेले शुद्ध सोने राजांच्या मुकुटावर शोभते, तर तू मात्र गरीब स्त्रियांच्या पायांवर अलंकार म्हणून राहतोस. बाह्य स्वरूपाने दोन्ही धातू चमकदार वाटले तरी त्यांची किंमत, गुणवत्ता आणि स्थान यांत स्पष्ट भेद आहे.

या प्रतिमेमागे कवीचा सूक्ष्म आशय असा आहे की केवळ बाह्य साम्यामुळे समानता सिद्ध होत नाही; खरा फरक गुणांमध्ये आणि पात्रतेत असतो. काही लोक स्वतला सोन्यासारखे मानतात, परंतु त्यांच्यात तितकीच किंमत किंवा तेज नसते. म्हणूनच ते उच्च स्थानी पोहोचत नाहीत. उलट, ज्यांच्यात खरे मूल्य, गुण आणि संस्कार असतात त्यांना आपोआप मानाचे स्थान प्राप्त होते.