कात्रज तलावातून काढलेला गाळ पुन्हा तलावात! पालिकेचा नियोजनशून्य कारभार

प्रमोद जाधव, पुणे
महापालिकेने शहरातील तलाब सुशोभीकरणाअंतर्गत कात्रज येथील प्राणिसंग्रहालयातील तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले होते. मात्र, तलावातील गाळ उचलून अन्यत्र न टाकता कृत्रिम बेटाच्या नावाखाली तलाबाकडेला ढीग लावला होता. मात्र, पावसामुळे तलावातून काढलेला 10 हजार क्युबिक मीटर गाळ पुन्हा तलावात गेला आहे. त्यामुळे पुणेकरांचे कररूपी लाखो रुपये गाळात गेले असून, यानिमित्ताने पालिकेचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कात्रज तलाब, जांभूळवाडी तलाव आणि पाषाण तलाव या तीन तलाबांसाठी प्रत्येकी 50 लाखांचा निधी उपलब्ध झालेला आहे. महापालिकेने सुरुवातीला कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलावातील गाळ काढण्याचे काम पाटबंधारे विभागाला दिले. तलाव कोरडा केला. दोन जेसीबी आणि चार डंपरच्या साह्याने 10 हजार क्युबिक मीटर गाळ तलावातून काढला होता. कात्रज तलावाचे गेट जुने झाले आहे. हे गेट बदलून घेण्याचे ठरले होते. तलावाचे काम मे अखेर पूर्ण करायचे होते. मात्र, गाळाचे काय करायचे, याचे नियोजन नव्हते. गाळाच्या माध्यमातून पक्ष्यांच्या अधिवासासाठी बेट उभारण्याबाबत चाचपणी सुरू होती. मात्र, ते तलावाच्या मध्यभागी की तलावाकडेला, यावर निर्णय झाला नव्हता. त्यातच मे च्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तलावातून काढलेला गाळ तलावातच पुन्हा वाहून गेला.

कात्रज, जांभुळवाडी, पाषाण या तीन तलावांच्या कामांसाठी 5 कोटी खर्च अपेक्षित आहे. यापैकी एक कोटी पाटबंधारे खात्याला अॅडव्हान्स दिले आहेत. आपल्या इस्टिमेटनुसार हे काम पंधरा कोटी रुपयांचे आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी रक्कम निश्चित केलेली आहे. त्यामुळे काढलेला गाळ पुन्हा तलावात गेला असला, तरी तो गाळ ठेकेदाराला पुन्हा काढावा लागणार आहे. संतोष तांदळे, अधीक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग, पुणे महापालिका.

आंबिल ओढ्याला पुराचा धोका
तलावापासून आंबिल ओढा सुरू होत असल्याने आंबिल ओढ्याला पुन्हा पुराचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेस व्यापारी सेलचे पुणे शहराध्यक्ष भारत सुराणा म्हणाले, या सर्व कामाची चौकशी करावी. तलावाबाहेर गाळ गेलाच नाही, त्यामुळे महापालिकेने दिलेले | पैसे पाटबंधारे खात्याकडून परत घ्यावेत.