
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाषण केले. त्या भाषणात नितीश कुमार यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याऐवजी अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव घेतले. नंतर त्यांनी स्वतःची चूक मान्य केली. विशेष म्हणजे, नितीश कुमार हे मोदींच्या शेजारी बसले होते. या चुकीनंतर नितीश कुमार यांनी 30 सेकंदांत दहा वेळा मोदींसमोर हात जोडले. एवढेच नव्हे तर सभेला हजर राहिलेल्या लोकांना उभे राहून मोदींना अभिवादन करण्यास सांगितले. नितीश कुमार यांची चूक चर्चेचा विषय ठरली.