मोदी सरकारला फक्त गर्भश्रीमंतांचीच चिंता – राहुल गांधी

मोदी सरकारला फक्त गर्भश्रीमंतांचीच चिंता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची युती तसेच काही मूठभर अब्जाधीश मंडळींमुळे देशातील लोकशाही आणि संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या देशातील दलित, आदिवासी आणि गरीब यांच्यासाठी संविधान आणि लोकशाही या दोनच गोष्टी सर्वस्व आहेत, असे परखड मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत व्यक्त केले.