श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी

राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून ठाणे जिल्हाधिकारी म्हणून श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक अजीज शेख यांची धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची जालना येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्णनाथ पांचाळ यापूर्वी जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.