
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन संघात पार पडला. या लढतीत मुंबईने विजय मिळवत क्वालिफायर टू मध्ये जागा मिळवली. मात्र या लढतीत मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यांच्यात वादाचा भडका उडाल्याची चर्चा सुरू झाली.
गिलने नाणेफेकी वेळी हार्दिक पंड्या याच्याशी हस्तांदोलन केले नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला. काहींनी असेही म्हटले की हार्दिकने गुजरात सोडून मुंबईमध्ये एन्ट्री केल्याने दोघांमध्ये वाद झाला. मात्र या सर्व चर्चांना एक खास पोस्ट शेअर करत दोघांनीही पूर्णविराम दिला आहे.
शुभमन गिल याने हार्दिकसोबतचा एक फोटो शेअर करत, “Nothing but love” (फक्त प्रेमच आहे) असे म्हटले. नंतर हार्दिक पंड्या याने देखील हीच पोस्ट शेअर केली आणि दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे सांगितले. या दोन्ही पोस्ट्समुळे चाहत्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. मैदानावरील द्वंद्व हे वैयक्तिक नसल्याचेच यामुळे स्पष्ट झाले