जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल!- उद्धव ठाकरे

मिंधे गटात बेबंदशाही आणि अंदाधुंद कारभार सुरू आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मिंधे गटातल्या सुजाता शिंगाडे या स्वगृही परतल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिंगाडे यांनी पक्षात प्रवेश केला.

मिंधे गटात बेबंदशाही आणि अंदाधुंद कारभार सुरू आहे. लोक शिवसेना सोडून कशासाठी जातात आणि तिथे काय होतं हे सुजाता ताईंना हे कळालं आहे. मिंधे गटात गेल्यावर अनेकांना पश्चाताप होत आहे. परत येण्याची धाडस आणि किंमत ही फक्त शिवसैनिकांमध्ये आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. सुजाता ताई या परत शिवसेनेत आल्या आहेत. हे मिंधे गटात असूनही मनाने शिवसेनेत असलेल्यांसाठी हा संदेश आहे. शिवसैनिकांमध्ये कुठला संभ्रम नाही. संदेश देण्याऐवजी आम्ही बातमीच देऊ.